नुकसानभरपाईची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा करावी; अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आमरण उपोषणाचा इशारा

नुकसानभरपाईची रक्कम 15 सप्टेंबरपर्यंत पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा करावी; अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आमरण उपोषणाचा इशारा

नांदेड – जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना गेल्या वर्षी (२०२४) मंजूर झालेली नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. शासनाकडून निधी येऊन अनेक महिने उलटले असले तरी, प्रशासन यादी तपासणीच्या नावाखाली टाळाटाळ करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या प्रशासनाच्या निष्काळजी भूमिकेचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवले. यावेळी शिवा नरंगले प्रशांत इंगोले, ॲड. बिलाल, मो. कासीम, मो. अतिख, मो. सादेख बाचोटीकर, शेख इम्रान, अब्दुल समी, मो. शोएब, शेख राशेद सहित वंचितचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फारुख अहमद यांनी प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी निवेदनात काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्वराज अभियान विरुद्ध भारत सरकार (२०१६) खटल्याचा संदर्भ आहे. या कायद्यांनुसार, आपत्तीग्रस्तांना मदत मिळणे हा त्यांचा घटनात्मक हक्क आहे.
याच आधारावर, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या मागण्या केल्या आहेत:

* २०२४ च्या अतिवृष्टीची प्रलंबित मदत १५ सप्टेंबर २०२५ पूर्वी पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करावी.
* नव्याने होणारे सर्वेक्षण ‘प्रति घर’ ऐवजी ‘प्रति कुटुंब’ याप्रमाणे करण्यात यावे.
* महाराष्ट्र शासनाच्या २०१५ व २०१९ च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांनुसार तातडीने मदत वितरण सुरू करावे.
* खडकपूरा आणि परिसरातील नाल्यांची दुरुस्ती, स्वच्छता व पुनर्बांधणी करावी.

फारुक अहमद यांनी स्पष्ट केले आहे की, वंचित बहुजन आघाडी आत्मघाती आंदोलनाच्या विरोधात आहे, पण प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे त्यांना आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. जर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तर आपण त्याच दिवशी सकाळी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत किंवा मरण येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading
    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन नांदेड: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारिपचे प्रथम नगरसेवक कालवश बाबुरावजी निलंगेकर यांच्या पत्नी उपासिका यशोदाबाई निलंगेकर यांचे आज, दिनांक १२…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत