राहुल साळवेंच्या तक्रारीची दखल; दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, प्रशासनाला विभागीय आयुक्तांचे आदेश

दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, अन्यथा ! नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाला विभागीय आयुतानी दिले कारवाईचे आदेश; राहुल साळवे यांच्या तक्रारीची घेतली दखल

नांदेड – जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी नगरपरिषदा व नगरपंचायती ह्या पाच टक्के राखीव निधी खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांची उन्नती होत नसून शासन स्तरावरून दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना असुन त्या दिव्यांगापर्यंत पोहोचविण्यासाठी नगर विकास विभागाकडून विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत परंतु ह्या योजना 2010 पासून कुठल्याच प्रकारे नगरपरिषद, नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न करता व विविध योजना अमलात आणत नसल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली. त्यांना जीवन जगण्यासाठी आधारच मिळत नाही. एकीकडे कामही करता येत नाही, मजुरीलाही जाता येत नाही, शासनाने दिलेल्या निधीवरच आपली उपजीविका करावी लागते हा निधी खर्च न केल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी त्वरित संबंधित विभागाला आदेश दिले असून दिव्यांगांचा निधी वेळेत खर्च करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आदेश दिले असल्याचे पत्र विभागीय आयुक्त यांनी संबंधित विभागाला दिले आहे,
सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते परंतु संबंधित अधिकारी वेळेतच हा निधी खर्च करीत नसून वर्षानुवर्षे दिव्यांगांना विविध योजनांचा निधीच खर्च केला जात नाही, याबाबतची तक्रार राहुल सिताराम साळवे यांनी केली होती, या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश दिले असून या आदेशावरून जिल्हाधिकारी यांनी संबंधित नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की 2010 पासून चा दिव्यांगांचा निधी त्वरित खर्च करावा अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल असे पत्र संबंधित जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार केल्याच्या नंतरच प्रशासनाला जाग आली आहे. वेळेत दिव्यांगांचा निधी खर्च करावा व तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये दिला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड शहरात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव; निधी व जागा संपादन करण्याबाबत सभेत घेतला जाणार निर्णय नांदेड: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सोमवार,…

    Continue reading
    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा नांदेड: येथील मोदी मैदानावर केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झालेल्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या चकाकीमागे सफाई कामगारांचे श्रम मात्र…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    नांदेड महानगरपालिकेची १६ मार्च रोजी पहिली सर्वसाधारण सभा; स्थायी समितीसह विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमातील सफाई कामगार मोबदल्यापासून वंचित; १२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; दरोड्यातील ६ आरोपींना अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन