तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख

तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख

नांदेड – वाढता तणाव सहज, सोप्या पद्धतीने कमी करून आनंदी व संतुलित जीवन जगता येते, त्यासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन तणाव व्यवस्थापन तज्ज्ञ अशोक देशमुख यांनी केले. ते नांदेड येथील आयआयबी इन्स्टिट्यूट येथे डॉ. बबन जोगदंड व मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तणाव व्यवस्थापनावरील व्याख्यानात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेड होते. यशदाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. बबन जोगदंड, आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथ पाटील यांची उपस्थिती यावेळी होती.
पुढे ते म्हणाले, आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत आहेत. अनेकजण नैराश्यात जाऊन आत्मघातकी विचार करतात. मात्र योग्य संवाद, कुटुंबासोबत वेळ घालवणे, योगसाधना व चिंतन यांच्या मदतीने तणाव कमी करता येतो. त्यांनी एकत्रित सहभोजन, सकारात्मक संवाद व नियमित व्यायाम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
नांदेडमध्ये प्रथमच हसत-खेळत तणाव व्यवस्थापनाचे व्याख्यान झाल्याची विशेष नोंद घेण्यात आली. देशमुख यांनी उपस्थितांना सोप्या व प्रभावी तणावमुक्तीच्या टिप्स दिल्या. याप्रसंगी डॉ. गोविंद नांदेडे व डॉ. बबन जोगदंड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, डॉ. विजयकुमार माहुरे, गटशिक्षणाधिकारी किशन फोले, डॉ. विलास ढवळे, डॉ. राम वाघमारे, डॉ. देविदास तारू, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. राम वाघमारे यांनी मानले

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल  नांदेड -महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने घोषित…

    Continue reading
    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज! आजच्या गतिमान अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीय कुटुंबावर वाढत्या महागाईसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खर्चाचे मोठे ओझे आहे. उत्पन्न मर्यादित असताना, हे दोन्ही खर्च दिवसेंदिवस…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    राज्यातील २९ महानगरपालिका आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर;  15 जानेवारी रोजी मतदान, 16 जानेवारीला निकाल 

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली