राहुल साळवेंच्या तक्रारीची दखल; दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, प्रशासनाला विभागीय आयुक्तांचे आदेश

दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, अन्यथा ! नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाला विभागीय आयुतानी दिले कारवाईचे आदेश; राहुल साळवे यांच्या तक्रारीची घेतली दखल

नांदेड – जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी नगरपरिषदा व नगरपंचायती ह्या पाच टक्के राखीव निधी खर्चच करत नसल्यामुळे दिव्यांगांची उन्नती होत नसून शासन स्तरावरून दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना असुन त्या दिव्यांगापर्यंत पोहोचविण्यासाठी नगर विकास विभागाकडून विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत परंतु ह्या योजना 2010 पासून कुठल्याच प्रकारे नगरपरिषद, नगरपालिका,नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न करता व विविध योजना अमलात आणत नसल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची वेळ आली. त्यांना जीवन जगण्यासाठी आधारच मिळत नाही. एकीकडे कामही करता येत नाही, मजुरीलाही जाता येत नाही, शासनाने दिलेल्या निधीवरच आपली उपजीविका करावी लागते हा निधी खर्च न केल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी त्वरित संबंधित विभागाला आदेश दिले असून दिव्यांगांचा निधी वेळेत खर्च करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असे आदेश दिले असल्याचे पत्र विभागीय आयुक्त यांनी संबंधित विभागाला दिले आहे,
सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना राज्य शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते परंतु संबंधित अधिकारी वेळेतच हा निधी खर्च करीत नसून वर्षानुवर्षे दिव्यांगांना विविध योजनांचा निधीच खर्च केला जात नाही, याबाबतची तक्रार राहुल सिताराम साळवे यांनी केली होती, या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेश दिले असून या आदेशावरून जिल्हाधिकारी यांनी संबंधित नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की 2010 पासून चा दिव्यांगांचा निधी त्वरित खर्च करावा अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल असे पत्र संबंधित जिल्हाधिकारी यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे.
राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे व विभागीय आयुक्ताकडे तक्रार केल्याच्या नंतरच प्रशासनाला जाग आली आहे. वेळेत दिव्यांगांचा निधी खर्च करावा व तक्रारींची दखल घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये दिला आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज! आजच्या गतिमान अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गीय कुटुंबावर वाढत्या महागाईसोबतच शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रातील खर्चाचे मोठे ओझे आहे. उत्पन्न मर्यादित असताना, हे दोन्ही खर्च दिवसेंदिवस…

    Continue reading
    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड ​लोहा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी;  गुन्हा दाखल होताच 3 दिवसांत आरोपीला अटक लोहा – ​तालुक्यातील ढगे पिंपळगाव येथे शेतीच्या…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    मध्यमवर्गीयांचे वास्तव: तक्रार नव्हे, स्वनियोजनाची गरज!

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय